Dharma Sangrah

राज्यात २० हजार पोलिसांची पदे भरली जाणार ,देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली

Webdunia
मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (08:50 IST)
मागील दोन वर्षापासून कोविड व अन्य कारणांमुळे रखडलेली पोलीस भरती आता राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यात आता तब्बल २० हजार पोलिसांची पदे भरली जाणार असल्याची माहिती  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: प्रसार माध्यमांना दिली.
 
“एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मी घेतलेला आहे. तो म्हणजे दोन वर्षांची पोलीस भरती आता आम्ही हाती घेत आहोत. साधारणपणे पोलिसांची २० हजार पदे भरण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे.” असं फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
 
याचबरोबर “या संदर्भातील कार्यवाही आम्ही लवकरात लवकर करू. जवळपास साडेसात ते आठ हजार पदांची एक जाहिरात निघालेली आहे. अजून १२ हजार पदांची एक जाहिरात ही लवकरच आम्ही काढणार आहोत. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर पोलीस भरती आम्ही करणार आहोत. मला असं वाटतं यामुळे पोलीस दलाला निश्चतपणे फायदा होईल.” असं ते म्हणाले 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये का भरते? इतिहास जाणून घ्या

राहुल गांधी मानहानी खटल्याची सुनावणी ठाणे न्यायालयाने 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली

LIVE: दौंडमध्ये 430 कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पाला सरकारकडून मंजुरी

रविवारीही 650 उड्डाणे रद्द सरकारने इंडिगोला नोटीस बजावली, कारवाई का करू नये विचारले

ज्युनियर हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना सात वेळा विजेत्या जर्मनीशी होईल

पुढील लेख
Show comments