Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवमान करणाऱ्या राज्यपालांना हटवावे , भाजपा मंत्र्यांनी माफी मागावी

Webdunia
मंगळवार, 3 जानेवारी 2023 (14:55 IST)
छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून हा इतिहास आहे. त्यांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांना हटवावे आणि भाजपा मंत्र्यांनी माफी मागावी अशी महाराष्ट्राने मागणी केली आहे. या अवमानासंदर्भात भाजपा गप्प बसले असून ते इतर विषयांकडे लक्ष्य वळवीत आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. मंगळवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेल्या भूमिकेवर भाजपाने आक्षेप घेतल्यानंतर त्यावरून राऊतांनी भाजपाच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “छत्रपती शिवाजी महाराज हे माफीवीर होते का? ते जुने-पुराणे नेते होते, आता त्यांचं महत्त्व नाही हे राज्यपालांचं विधान भाजपाला मान्य आहे का? यावर आधी उत्तर द्यावं. शिवाजी महाराजांचा अपमान हा सगळ्यात मोठा अपमान आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होतो आणि तिथेच संपतो. इतर राज्यांना भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. शिवाजी महाराज इथे जन्माला आले म्हणून हा इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्राने राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. त्यावर भाजपाने आपले मत आधी व्यक्त करावे. सुरुवात करायची आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या विषयापासून करावी लागेल. त्यावरून तुम्ही लक्ष दुसरीकडे वळवू शकत नाही”, असे संजय राऊत यांनी म्हटले.
 
“जे उद्योग एकावेळी दीड-दोन लाख रोजगार देऊ शकत होते, असे वेदांतासारखे उद्योग गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने तिथे पळवले, ज्यामुळे बेरोजगारीचा फटका हा सगळ्यात जास्त महाराष्ट्राला बसतोय”, अशा शब्दांत केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर टीका करताना राऊत म्हणाले.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments