suvichar

मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर

Webdunia
बुधवार, 16 ऑगस्ट 2017 (09:23 IST)
मराठवाड्यात पावसाने पेरणापुर्वी वेळेत दमदार हजेरी लावल्याने आनंदी झालेल्या बळीराजाने बिकट आर्थिक परिस्थिती असतानाही खरिपाचा अक्षरशः जुगार खेळला. त्याने उसणवारी करत पेरणी केली. मात्र पावसाने दिड-दोन महिन्यापासून दांडी मारल्याने पिके जळू लागली आहेत. खरीपाचा हा जुगार हरलेल्या शेतकऱ्यांना पाणावलेल्या डोळ्यांनी पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, विधानसभा-लोकसभेत वेगवेगळ्या विषयावर रणकंदन माजवले जात असताना हतबल झालेल्या शेतकऱ्यांविषयी कोणताही लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाही.
 
गेली 4 वर्ष दुष्काळ सहन करत घर सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना नापिकीने, कधी अवकाळीने, कधी गारपिटीने तर कधी अतिवृष्टीने मारले आहे. डोक्‍यावर असलेले कर्ज आणि खांद्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी धीर धरून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता नविन संकट उभे राहिले आहे. हवामान खात्याच्या खोटारडे अंदाजावर विश्‍वास ठेवत शेतकऱ्यांनी दिरवेगार स्वप्न पाहिले. मात्र, मागील दिड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने हि हिरवी स्वप्ने आता करपू लागली आहेत. खरीपाची पिके पाण्याअभावी वाळत असताना नांगर फिरवण्याशिवाय मार्ग दुसरा नसल्याचे शेतकरी वर्गात बालले जात आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्येही वेगवेगळ्या विषयांवर विधानसभेत आणि लोकसभेत रणकंदन माजले असताना हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर पोटतिडकीने कोणताही लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अस्मानीसोबतच सुलतानी मार सहन करण्याची वेळ आली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

'SIR 2' साठी भाजप महाराष्ट्राने केली विशेष तयारी, प्रतिनिधींची यादी जाहीर

मुंबई: धारावी येथे छाप्यात लाखो रुपयांची औषधे जप्त

LIVE: एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय हनुमंत जगदाळे यांची ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेतेपदी नियुक्ती

नाशिकमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत होता

रेल्वेने मुंबई ते प्रयागराज दरम्यान ४४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला

पुढील लेख
Show comments