rashifal-2026

मग हॅकरने केलेले आरोप कसे खरे वाटले : खडसे

Webdunia
सोमवार, 28 जानेवारी 2019 (09:16 IST)
अमेरिकेतील हॅकर सय्यद शुजा याने ईव्हीएम मशीनच्या हॅकिंगबाबत गोपीनाथ मुंडे यांना माहिती असल्यानेच त्यांची हत्या झाल्याचा दावा केला आहे. यामुळे भाजपातील नेते हॅकर खोटारडे असतात, त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नये, असे म्हणत आहेत. मात्र, माझ्या बाबतीत हॅकर मनीष भंगाळे यांने थेट दाऊदशी संबंध जोडले, त्याच्या बोलण्यावर कसा विश्‍वास ठेवला? असा प्रश्‍न माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. फैजपूर येथे पत्रकार संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या वक्‍तव्यामुळे भाजपाची चांगलीच अडचण झाली आहे. 
 
आ. खडसे म्हणाले, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या ईव्हीएम मशीनच्या माहितीमुळे झाली असल्याचा दावा हॅकर सय्यद शुजा याने केला.  त्यानंतर भाजपाने हॅकर हे खोटारडे असल्याने त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नये, अशी भूमिका मांडली आहे. मात्र, माझ्या बाबतीत हॅकरने केलेले आरोप कसे खरे वाटले. तसेच या प्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाअंती हा दावा खोटा ठरला. 
 
मुंडे यांच्याबाबत हॅकरला खोटे ठरविणार्‍यांना माझ्याबाबत कसे खरे वाटले? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. माझ्यावर झालेल्या मीडिया ट्रायलमुळे मला पदाचा राजीनामा द्यावा लागला. अशा मीडिया ट्रायलमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्‍त केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

विक्रेत्यांकडे आता क्यूआर कोड असतील; रेल्वे अवैध फेरीवाल्यांवर कडक कारवाई करणार

"ती एक महिला आहे, तिने जास्त बोलणे योग्य नाही..."राहुल गांधींना 'टपोरी' म्हटल्याबद्दल आदित्य ठाकरेंची कंगनावर टीका

गेटवे ऑफ इंडिया येथे आधुनिक जेट्टी बांधण्याची योजना, मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत माहिती दिली

LIVE: खडकवासला-फुरसुंगी बोगदा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा

संतप्त झालेल्या गौतम गंभीरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली; हे आहे कारण.....

पुढील लेख
Show comments