Publish Date: Mon, 30 Sep 2024 (17:36 IST)
Updated Date: Mon, 30 Sep 2024 (17:52 IST)
अमरावती जिल्ह्यात आणि परतवाडा, चिखलदरा येथील सीमाडोह तालुक्यात अनेक गावात आज दुपारी 1.00 ते 1.20 च्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले
या नंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लोकांनी या बाबतची माहिती तातडीनं जिल्हाधिकारी कार्यालयात दिली. सुदैवाने या मध्ये कोणतीही जनधन हानी झाली नाही.
या घटनेनन्तर चिखलदरा परतवाडा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 होती. अमरावतीच्या जिल्हादंडाधिकाऱयांनी माहिती दिले, ते म्हणाले, परतवाडा, चिखलदरा, आर्चिकालतराजवळील सीमाडोह परिसरातून जमीन हादरत असल्याची माहिती मिळाली
एनसीएसने सांगितले की, जिल्ह्यातील चिखलधारा तालुक्यातील तेटू गावात दुपारी 1.37 वाजता भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू 13 किलोमीटर खोलीवर होता.