Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केलेल्या आरोपांबाबत पुरावे द्या, एकनाथ खडसेंचे चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान

Webdunia
बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (08:15 IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी टीका करत अजित पवार यांनी आयुष्यभर पैसे काढून जमिनी लाटल्याचं काम केल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अनुभवावरुन अजित पवारांवर आरोप केला असल्याची टीका खडसेंनी केली. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांबाबत पुरावे द्यावे. पुरावे दिल्यास मी चंद्रकांत पाटील यांच्यासोबत उभा राहील, असे थेट आव्हान खडसेंनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे.
 
खडसे यांनी गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही भाजपवर निशाणा साधला. गोव्यात भाजप इतर पक्षांच्या कुबड्या घेऊन सत्तेवर होती. मात्र यावेळी गोव्याचा राजकारणातील चित्र वेगळे आहे. आप, समाजवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा जोर चांगला दिसतोय. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला भाजपने तिकीट नाकारल्याने गोव्यात भाजपविषयी नाराजी आहे, असं मत माजीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मांडलं आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत आज भाषण करताना काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यावरही खडसेंनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला दिशा देतील असे काही भाषण करतील, अशी अपेक्षा होती. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधानांचे भाषण हे देशाला दिशा देणारे भाषण असेल पाहिजे. मात्र पंतप्रधानांचे भाषण हे राजकीय दृष्टीकोणाचं होतं. पंतप्रधानांच्या ६० मिनिटांच्या भाषणात मोदींनी ५० वेळा काँग्रेसचे नाव घेतले. कोरोना काळात सोडलेल्या गाड्या या महाराष्ट्र सरकारने सोडल्या नसून केंद्राच्या रेल्वे बोर्डाने सोडल्या होत्या. गुजरातमधूनही श्रमिकांसाठी गाड्या सोडण्यात आल्या. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो प्रकार घडला तो दुर्दैवी, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

LIVE: मला फक्त दोन तासांसाठी ईडीची कमान द्या,संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

लातूर मध्ये वेगवान एसयूव्ही हॉटेलात शिरली, एकाचा मृत्यू, चार जखमी

बेकायदेशीर कोळसा खाण कोसळल्याने पती-पत्नीचा वेदनादायक मृत्यू

पुढील लेख
Show comments