Dharma Sangrah

शेतकरी संपामुळे लासलगाव बाजार समितीत शेतमालाची आवक घटली

Webdunia
शेतकरी वर्गाने पुकारलेल्या संपाचा मोठा फटका देशातील नव्हे तर आशियातील सर्वात मोठी कांदा बाजार पेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीला बसला आहे. कोणताही माल विक्री करायचा नाही म्हणून अनेकांनी माल विक्रीस आणलाच नाही, त्यामुळे उलाढाल ठप्प झाली आहे.

शेतकरी संपाला गेल्यावर्षी एक जून पासून सुरू झालेल्या संपानंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप सुटलेले नसल्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.आजपासून सुरू असलेल्या शेतकरी संपामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज दिवसभरात फक्त ९ वाहने लीलावास आली.संपूर्ण बाजार आवार हा ओस पडलेला होता.लासलगाव मधील सर्व अर्थकारण हे या बाजार समितीवरच अवलंबून असल्याने संपूर्ण लासलगाव मध्ये संपाच्या पहिल्या दिवशिच परिणाम जाणवू लागलेला आहे.

शेतकरी संपामुळे कांदा,भाजीपाला,धान्य यांच्या आवकेवर फटका बसल्याचे दिसून आले.तर दुसरीकडे ग्रामीण अर्थकारण संकटात सापडलं आहे. शेतकरी संपामुळे आशियातली सर्वात मोठी कांदा बाजार समिती असलेली लासलगाव बाजार समिती ओस पडली आहे. दररोज होणारी १५ ते २० हजार क्विंटल कांद्याची आवक आणि दोन ते अडीच कोटी करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.संपूर्ण कर्जमाफी व शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. या संदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, यासाठी काल पासून (शुक्रवार) दहा दिवस शेतकरी संप पुकारला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

बडगाममध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्या; मृतदेह घरापासून २०० मीटर अंतरावर आढळला

दुर्दैवी घटना: खेळता-खेळता बाथरूममध्ये गेली, बादलीत पडून १ वर्षाच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू

MI vs RR : राजस्थान रॉयल्सने मुंबईला ३० धावांनी हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला; पंजाब-KKR स्पर्धेतून बाहेर

WHO चा गंभीर इशारा! इबोलाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू

LIVE: नागपूर लॉजिस्टिक्स हब बनेल

पुढील लेख
Show comments