rashifal-2026

बुलढाण्याजवळ खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; “इतके” जण ठार

Webdunia
शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (15:02 IST)
बुलढाणा : नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या राही ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात (बस क्र. MH 20 EL4999) झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात समृद्धी महामार्गावर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये २० प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात बुलढाणा जिल्ह्यामधील देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ झाला आहे. अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर निघून महामार्गाच्या बाजूला जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले आहे. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बस समृद्धी महामार्गाच्या मध्यभागी पलटी झाली होती. त्यानंतर अपघातग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर पडत होते. यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. म्हणजे एकूण २१ प्रवासी जखणी झाल्याची माहिती मिळाली आहे.
 
दरम्यान, जखमींना देऊळगाव राजा आणि जालना येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. हा अपघात रात्री साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातामधील ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या सहा प्रवाशांना जालन्यातील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुणे न्यायालयात सावरकर मानहानीचा वाद पेटला, सावरकर कुटुंबाने राहुल गांधींच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

World Wildlife Conservation Day 2025 आज वन्यजीव संवर्धन दिन, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

पुण्यातील हवा विषारी झाली, AQI ३३६ सह मुंबईपेक्षाही अधिक धोकादायक: आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत देशाची पहिली शहरी सुरंग बनेल, जाणून घ्या ही कशी खास आहे?

Koregaon Park Land Scam मुख्य आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक

पुढील लेख
Show comments