Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आर्थिक राजधानी कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर १ टक्क्यांवर आला, मनपाच्या उपाययोजनांमुळे आता नियंत्रणात

Webdunia
शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (07:58 IST)
आर्थिक राजधानी मुंबईतील कोविडची तिसरी लाट पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आता नियंत्रणात आली आहे. २१ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईतील कोविड पॉझिटिव्हिटीचा दर १ टक्केपर्यंत वाढला होता. मात्र आता ५६ दिवसांनंतर पॉझिटिव्हिटीचा दर पुन्हा १ टक्क्यांवर आला आहे.  समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे, असे पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी म्हटले आहे.
 
मुंबईत मार्च २०२० रोजी कोविड संसर्गाला सुरुवात झाली होती. त्यानंतर काही गाफील लोकांमुळे मुंबईत कोविडचा संसर्ग वाढून कोविडची पहिली व दुसरी लाट आली होती. मात्र पालिकेने विविध उपाययोजना करून त्यावर नियंत्रण मिळविले होते. मात्र पुन्हा एकदा काही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे डिसेंबर २०२१ ला पुन्हा एकदा कोविडचा संसर्ग वाढून तिसरी लाट आली.
 
या तिसऱ्या लाटेमुळे मुंबईत कोविडचे २ लाख ८५ हजार रुग्ण आढळून आले होते. या तिसर्‍या लाटेच्या ५६ दिवसांत कोविडमुळे ३१२ रुग्णांचा मृत्यू झाला. दररोज सरासरी ५.५ मृत्यू झाले. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही तुलनात्मक शहरासाठी तिसऱ्या लहरीतील हा सर्वात कमी एक अंकी मृत्यूदर आहे. ही आपल्या सर्वांसाठी खूप समाधानाची आणि अभिमानाची बाब असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
 
मुंबईत कोविडला रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून कोविड लसीकरण मोहीम सुरू झाली. एका वर्षात मुंबईतील ११४ टक्के नागरिकांना लसीचा पहिला तर ९५ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

Bus Accident : मध्य प्रदेशातील राजगडमध्ये भीषण रस्ता अपघात,बस पुलावरून खाली कोसळली, 2 ठार 52 प्रवासी जखमी

Pune Porsche Accident:अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, सीसीटीव्ही फुटेज वरून उघड

KKR vs SRH: अंतिम फेरी गाठण्यासाठी KKR आणि SRH यांच्यात लढत होणार!सामना कुठे आणि कोणत्या वेळी जाणून घ्या

चीनमध्ये एका प्राथमिक शाळेत चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू, पाच जण जखमी

Chess : कार्लसन विजेता, विश्वनाथन आनंद तिसऱ्या स्थानावर

IPL Playoffs Schedule:IPL प्लेऑफ सामने कधी खेळले जातील हे जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय चहा दिवस, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

पुढील लेख