Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नांदेड कंधार येथील जगतुंग तलावात बुडून पाच जणांना मृत्यू

Webdunia
सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (08:42 IST)
नांदेड कंधार येथील जगतुंग तलावात बुडून पाच जणांना मृत्यू ,जगतुंग तलावात बुडून पाच जणांना मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना समोर आली. मृत नांदेड येथील खुदबईनगरमधील एकाच कुटुंबातील असून सर्वजण कंधारमधील बडी दर्गाहच्या दर्शनासाठी गेले होते.
 
मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार (वय ४५), त्यांचा मुलगा मोहम्मद साद मोहम्मद शफीउद्दीन (वय १५), सय्यद सोहेल सय्यद वाहिद (२०), सय्यद नवीद सय्यद वाहिद (१५) (दोघे सख्खे भाऊ) या दोघांचा मामा मोहम्मद विखार (२३), अशी मृतांची नावे आहेत. सर्व आपल्या नातेवाईक व कुटुंबासह कंधार येथील हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम (बडी दर्गाह) च्या दर्शनासाठीरविवारी दुपारी १ वाजता गेले होते.
 
दर्गाहचे दर्शन झाल्यानंतर हे पाच जण व कुटुंबातील एक महिला जेवण करण्यासाठी तसेच जगतुंग तलाव पाहण्यासाठी गेले होते. तलावाकाठी जेवण करून प्लेट धुण्यासाठी पाण्याजवळ गेलेल्या एकाचा पाय घसरला. तो तलावात पडल्याचे पाहून इतरांनी त्यास वाचविण्यासाठी तलावाकडे धाव घेतली. एक-एक करुन सर्व जण तलावात उतरले. तलावात बुडत असताना सोबत असलेल्या त्यांच्या कुटूंबातील महिलेने पाहिले व त्यासंबंधातील माहिती दर्गाहमध्ये असलेल्या त्यांच्या इतर नातेवाईकांना दिली. याची माहिती कळताच स्थानिक लोकांनी तलावाकडे धाव घेत बुडत असलेल्या पाच जणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तत्काळ त्यांना रुग्णवाहिका व ऑटोरिक्षाने ग्रामीण रुग्णालयात आणले. तपासणीअंती डॉक्टरांनी पाचही जणांना मृत घोषित केले.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments