Festival Posters

कोकणात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

Webdunia
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (12:53 IST)
राज्यात पावसाने जोर पकडला आहे. मुंबई आणि भोवतील परिसरात पावसामुळे लोक हैराण होत आहे. अशात कोल्हापूर तसेच कोकणातील काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबई, कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे असून खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात विविध ठिकाणी एनडीआरएफ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
 
राज्याच्या विविध भागांत नद्यांना पूर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून ‘एनडीआरएफ’च्या मुंबईत पाच, सातारा, ठाणे, पालघर, नागपूर, रायगड जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.
 
मुंबई, कोकण आणि कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. तसेच पावासाने आतापर्यंत दोन लोकांचा बळी घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला असून मुंबईत मस्जिद बंदर येथे विजेच्या धक्क्याने रेल्वेचा एक कर्मचारी ठार झाला. 
 
अतिवृष्टीत अडचणीत सापडलेल्या लोकांना तातडीने मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये ४४°C उष्णतेची तीव्र लाट, ऑरेंज अलर्ट

पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सीएनजीचा धक्का, ११ दिवसांत दरात चारपट वाढ

LIVE: धुळे येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून खळबळजनक हत्या

चाळीस हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तीसाठी कोणती कार सर्वोत्तम आहे

विदर्भात 'ऑपरेशन लोटस' योजनेची चर्चा, विधान परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ६० नगरसेवक नॉट रिचेबल

पुढील लेख
Show comments