Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गेले वर्षभर आम्ही मितू सिंह हाच आरोपी असल्याचे सांगत होतो सदिच्छाचे वडील

गेले वर्षभर आम्ही मितू सिंह हाच आरोपी असल्याचे सांगत होतो सदिच्छाचे वडील
Webdunia
शनिवार, 21 जानेवारी 2023 (08:26 IST)
१४ महिन्यांपूर्वी मुंबईतील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी पालघरची सदिच्छा साने बेपत्ता झाली होती. त्यानंतर आज या प्रकारांत आरोपी असलेल्या मितू सिंहने तिची हत्या केल्याची कबुली दिली. हत्या करुन सदिच्छाचा मृतदेह वांद्रे बँड स्टँडच्या समुद्रात फेकल्याचेही त्याने कबूल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी वांद्रे बँड स्टँडजवळ समुद्रात सदिच्छा सेनेचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु केले होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात आरोपी मितू सिंहने आपला जबाब अनेकदा बदलला आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर अधिक वाढत गेला. अखेर त्याने आपणच तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच, ज्या ठिकाणी सदिच्छाचा मृतदेह टाकला होता ती जागा देखील पोलिसांना दाखवली. आज सकाळपासून पोलिसांनी नौदलाच्या साहाय्याने शोधमोहीम सुरु कलेची होती. मात्र, काहीही हाती न लागल्याने ही मोहीम थांबवण्यात आली. मात्र, पुन्हा एकदा पोलीस दुसऱ्या यंत्रणांच्या साहाय्याने शोध घेणार असल्याचे सांगितले आहे.
 
सदिच्छा सानेचे वडील मनीष साने यांनी यावर म्हंटले आहे की, "सदिच्छा सानेची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलीस बनाव करत आहेत." असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, गेले वर्षभर आम्ही मितू सिंह हाच आरोपी असल्याचे सांगत होतो. मात्र पोलिसांनी तेव्हा या प्रकरणाचा योग्य तपास का केला नाही? जर मितू सिंहने माझ्या मुलीची हत्या करुन समुद्रात फेकले असेल तर तिचा मृतदेह का सापडत नाही?" असा सवाल त्यांनी विचारला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

'माझ्या मित्रांना कसे सांगू मी दोन मुलींचा बाप आहे', मुलीच्या जन्माची लाज वाटणाऱ्या पतीने पत्नीला दिली भयंकर शिक्षा

LIVE: हिंसाचारानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपूरला भेट देणार

Nagpur violence: हिंसाचारानंतर मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच नागपूरला भेट देणार

मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला

भीक मागण्यासाठी या देशात सरकारकडून परवाना घ्यावा लागतो, चला जाणून घेऊया

पुढील लेख
Show comments