Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पहिल्या दिवसापासून कोणाला माहीतीय ५५-५४ चा मुख्यमंत्री होईल

Webdunia
शुक्रवार, 9 जुलै 2021 (23:02 IST)
महानगर पालिका त्रिशंकूच पाहिजे हे लक्षात घ्या, ४०- ४५ जागा जिंकलो की १०० टक्के महापौर आपलाच. आपण फार मोठं स्वप्न बघत नाही की, शंभर येतील दीडशे येतील, तसे येणार नाहीत. हे आपल्याला माहिती आहे. महापौर आमच्याशिवाय होणार नाही…जसं आम्ही म्हणालो, मुख्यमंत्री आमचाच….झाला की नाही…झालाच, पहिल्या दिवसापासून कोणाला माहीतीय ५५ – ५४ चा मुख्यमंत्री होईल. असे दोन चार पत्ते इथं हातात घ्या असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत सत्ता कशी आणायची याचे धडे दिले. पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते संबोधित करत होते. 
 
यावेळी, संजय राऊत म्हणाले की, माझ्या अख्ख्या आयुष्यात मंत्रालयात तीन वेळेस गेलो. मी मंत्रालयात जात नाही, काही नसतं मंत्रालयात. महानगर पालिका, जिल्हा परिषदा ही आपली ताकद आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या ४०- ४५ जागा जिंकलो की शंभर टक्के महापौर आपलाच. महानगर पालिका त्रिशंकूच पाहिजे हे लक्षात घ्या. आपण फार मोठं स्वप्न बघत नाहीत. की, शंभर येतील दीडशे जागा येतील. तसे येणार नाहीत हे आपल्याला माहिती आहे. पण, महापौर आमच्याशिवाय होणार नाही..जस आम्ही म्हणालो, मुख्यमंत्री आमचाच….झाला की नाही…झालाच, पहिल्या दिवसापासून कोणाला माहीतीय ५५- ५४ चा मुख्यमंत्री होईल. असे दोन-चार पत्ते इथं (पिंपरी-चिंचवड) मध्ये हातात घ्या. ३०- ४० जागा निवडून आणून महापौर करता येईल. अन्यथा दुसरा पर्याय आहे. असे म्हणत त्यांनी सत्ता कशी आणायची हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना लक्षात आणून दिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगणा तालुक्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीची मृत्यू

LIVE: शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले राज्यात सीबीएसई पॅटर्न २ टप्प्यात लागू करणार

पालघर मध्ये तरुणाने विषारी कार्बन मोनोऑक्साइड वायू श्वासाने घेऊन केली आत्महत्या

औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारक... वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुढील लेख
Show comments