Festival Posters

करारा जबाब मिलेगा! राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी मनसे आक्रमक

Webdunia
शनिवार, 9 एप्रिल 2022 (17:15 IST)
येत्या 12 एप्रिल रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात सभा होणार असून या सभेपूर्वी अनेक घडामोडी मनसेत घडल्याने 12 एप्रिल रोजी होणाऱ्या या सभेत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार या कडे सर्वांचं लक्ष वेधत आहे. या पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी मुंबईत झालेल्या सभेत मशिदीवरून भोंगे उतरवण्याबाबत वक्तव्य दिले होते. त्याचे राजकीय पडसाद देखील उमटताना दिसून आले. आता या सभेत राज ठाकरे काय बोलणार याचा कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 12 एप्रिल रोजी ठाण्यात होणाऱ्या या सभेसाठी मनसेने जय्यत तयारी सुरु केली आहे. या सभेपूर्वी मनसेकडून एक टिझर देखील रिलीझ करण्यात आलं आहे. या टिझर मधून सर्व टीकांना करार जबाब राज ठाकरे देण्याचं सांगितले आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. 

<

करारा जवाब मिलेगा#उत्तरसभा pic.twitter.com/KwXm9mbsKM

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 9, 2022 >या मनसेच्या टिझर मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार,शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रया दाखविण्यात आल्या आहेत.  
 आता महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असून त्यापूर्वी मनसे आक्रमक झाली आहे. या पूर्वी मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील 12 तारखेच्या सभे संबधी ट्विट केले होते. त्यात त्यांनी शिवतीर्थावरील सभेने तुमची झोप उडाली आता ठाण्यात  12 तारखेच्या उत्तरासभे नंतर तुमचं काय होईल ?  आता या 12 एप्रिल रोजी ठाण्यात राज ठाकरे काय म्हणतात हे जाणून घेण्याकडे सम्पूर्ण राज्याला उत्सुकता लागली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी

LIVE: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

मुकेश अंबानी म्हणाले की, एआय देशाचे भाग्य बदलेल - पुढील दोन-तीन दशकांत भारत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा वस्तुस्थिती असल्याचा प्रताप सरनाईक यांचा दावा

पुढील लेख
Show comments