Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गझलकार व साहित्यिक कमलाकर आत्माराम देसले यांचे निधन

Webdunia
शनिवार, 4 जून 2022 (21:55 IST)
फोटो साभार -सोशल मीडिया गझलकार व साहित्यिक कमलाकर आत्माराम देसले (५९) यांचे मालेगाव येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.देसले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. 
 
देसले यांनी दीर्घकाळ झोडगे येथील जनता विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली. देसले यांचे ‘ ज्ञानिया तुझे पायी’, ‘काळाचा जरासा घास’ हा गझलसंग्रह, कवी खलील मोमीन व कमलाकर देसले यांच्यात प्रदीर्घ काळ चाललेल्या कवितेतल्या पत्रव्यवहारावर आधारित ‘बिंब-प्रतिबिंब’, ‘काही श्वास विश्वासाठी' हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. विविध वृत्तपत्रे, मासिकांमधून त्यांनी सातत्याने लेखन केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. (द्वितीय)अभ्यासक्रमात त्यांच्या पाच कवितांचा समावेश करण्यात आला होता तर पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी. ए. च्या अभ्यासक्रमात देखील तीन गझलांचा समावेश होता. काही ग्रंथांचे त्यांनी संपादन व अनुवादही केले होते. तर काही चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे.
 
देसले यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यात सह्याद्री वाहिनी व रंगबावरी संस्था मुंबईचा महाकवी कालिदास राज्यस्तरीय पुरस्कार, धरणगावचा राज्यस्तरीय बालकवी पुरस्कार, उदगीरचा राज्यस्तरीय साहित्य प्रबोधन पुरस्कार, नांदगावचा राज्यस्तरीय समता काव्य पुरस्कार, राज्यस्तरीय स्मिता पाटील शब्दपेरा काव्य पुरस्कार, नाशिकच्या सावानाचा कवी गोविंद पुरस्कार, साहित्य सावाना पुरस्कार, गिरणा गौरव पुरस्कार, माउली साहित्य भूषण पुरस्कार, ज्ञानप्रबोधिनी पुण्याचा अध्यापकोत्तम पुरस्कार, कसमादे गौरव पुरस्कार आदी पुरस्कार ,मिळाले आहेत.

संबंधित माहिती

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

पुढील लेख
Show comments