Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राणा दाम्पत्याला भेटायला जाणार, हिंमत असेल तर गुंड पाठवा - किरीट सोमय्या

Webdunia
गुरूवार, 5 मे 2022 (08:47 IST)
मुंबई  पनवेल: हनुमान चालीसा आणि त्याविषयी असलेली भावना व त्यातून झालेलं प्रतिकात्मक आंदोलन राजद्रोह कसा होऊ शकतो, असा सवाल भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. किरीट सोमय्या यांनी पनवेलमध्ये माध्यमांशी संवाद साधला. कोर्लई अलीबाग येथील 19 बंगला घोटाळा लपविण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचा  दुरुपयोग झाल्याप्रकरणी जनहित याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली. तसंच सचिन वाझे, प्रदीप शर्मा  यांचे कनेक्शन फक्त ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांसाठी झाले असल्याचे अधोरेखित केले. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची संशयास्पद भूमिका असल्याचंही सोमय्या म्हणाले.  
 
हनुमान चालीसाचे मातोश्री बाहेर पठण करण्याचा प्रामाणिक उद्देश घेऊन राणा  दाम्पत्य मुंबईत आले होते. मात्र ठाकरे सरकारला त्याची चीड आली आणि त्यांच्यामागे कार्यकर्ते आणि पोलिसांचा ससेमिरा लावण्यात आला. त्याच्यापलीकडे जाऊन त्यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारने राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. धार्मिक आणि सामाजिक भावना लक्षात घेता हा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे अत्यंत निषेधार्ह आहे. पोलीस कोठडीतून नवनीत राणा आणि रवी राणा यांची सुटका झाल्यानंतर मी त्यांची मुंबईत भेट घेणार आहे असं सोमय्यांनी सांगितलं.हिंमत असेल तर त्या ठिकाणी माझ्यावर हल्ला करायला गुंड पाठवावेत, असं आव्हानही सोमय्यांनी ठाकरे यांना केलं आहे.

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments