Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासनाचे आर्थिक पाठबळ; जूनअखेर 27 कोटी 31 लाख रुपयांचा निधी मंजूर

Webdunia
गुरूवार, 29 जून 2023 (07:46 IST)
मुंबई  : समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी केंद्र सरकारचा 50 टक्के व राज्य शासनाचा 50 टक्के या प्रमाणात निधी दिला जातो.
 
या योजनेंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस माहे जून 2023 मध्ये 27 कोटी 31 लाख 76 हजार रुपये एवढा निधी शासनाने मंजूर केला आहे. हा निधी क्षेत्रीय कार्यालयांना खर्च करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला असून त्यात मुंबई विभाग 4 कोटी 39 लाख 68 हजार, पुणे विभाग 5 कोटी 33 लाख 50 हजार, नाशिक विभाग 5 कोटी 79 लाख 50 हजार, अमरावती विभाग 3 कोटी 86 लाख 50 हजार, नागपूर विभाग 6 कोटी 52 लाख, औरंगाबाद विभाग  64 लाख 50 हजार, लातूर विभाग 76 लाख 8 हजार याप्रमाणे निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून 5,460 पेक्षा अधिक जोडप्यांना लाभ मिळणार आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे आयुक्त, डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.
 
या योजनेंतर्गत प्रति जोडप्यास रुपये 50 हजार अर्थसहाय्य देण्यात येते. ही रक्कम पती-पत्नी यांच्या संयुक्त नावाने देण्यात येते. ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन व शिख या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पुणे पोर्शे अपघात: अल्पवयीन आरोपींच्या सुटकेविरोधात पोलीस सर्वोच्च न्यायालयात जाणार

यवतमाळमध्ये भीषण अपघात, गुरुद्वारात दर्शनासाठी जाणाऱ्या 4 भाविकांचा मृत्यू

चार्टर्ड अकाउंटंट दिवस

राष्ट्रीय डॉक्टर दिवस

कोण आहेत IAS सुजाता सौनिक? ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव झाल्या

सर्व पहा

नवीन

कोठडीत बुटाच्या लेसने फासावर लटकला, बलात्कार आणि खून करणाऱ्या आरोपीच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ !

पत्नीशी जबरदस्ती अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवायचा, गुन्हा दाखल

1 जुलैपासून देशात तीन मूलभूत फौजदारी कायदे बदलले जाणार आहेत.

महाराष्ट्राच्या काही भागाला मान्सून हुलकावणी का देतो? पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे काय?

वीज कोसळल्यामुळे पुजारीसोबत तीन जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुढील लेख
Show comments