Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पूरबाधित कुटुंबांना आणखी तीन महिने धान्य मोफत

Grain free for three more months for flooded families
Webdunia
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 (16:31 IST)
निवारा केंद्रात असलेले पूरग्रस्त लोक आता परत आपापल्या घरी परतत आहेत. शासनाच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबांना मोफत धान्य वाटपही सुरू केले आहे. तसेच पूरबाधित कुटुंबांना आणखी तीन महिने धान्य मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे निवारा केंद्रांची संख्या कमी होऊ लागली आहे. रविवार अखेर पूरग्रस्तांना १९ कोटी ७८ लाख २० हजार इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले आहे. पूरग्रस्त ४७४ गावांतील ९४ हजार २७४ एवढी पूरग्रस्त कुटुंबांची संख्या आहे.
 
रविवार अखेर ४१ हजार ४९५ कुटुंबांना गहू व तांदूळ प्रत्येकी दहा किलो याप्रमाणे ८२९.९० मेट्रिक टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे. धान्य वाटपाच्या कालावधीत बदल केला असून पूरबाधित कुटुंबांना आणखी तीन महिने धान्य मोफत दिले जाणार आहे. त्यामुळे पूरबाधीत कुटूंबांना पुढील काही महिने चिंता करण्याची गरज नाही, असे  चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

कुणाल कामरा यांना देशविरोधी संघटनांकडून 4 कोटी रुपये मिळाल्याचा शिवसेना नेते निरुपम यांचा मोठा आरोप

CBSE ने इयत्ता 9 वी ते 12 वी साठी नवीन अभ्यासक्रम जारी केला

आरएसएस स्वयंसेवक स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काम करतात-मोहन भागवत

कामाख्या एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले, अपघातात 7 जखमी

म्यानमारमध्ये पुन्हा 5.1 तीव्रतेचा भूकंप आला; आतापर्यंत 1700 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments