Festival Posters

सेलिब्रेशन : 24, 25, 31 डिसेंबरला बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु

Webdunia
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (09:52 IST)

नाताळ आणि नववर्षानिमित्त मुंबईतील हॉटेल, बार आणि पब्स उशिरापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.  24, 25 आणि 31 डिसेंबरला बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत, तर वाईन शॉप रात्री 1 पर्यंत खुले राहणार आहेत. गृह खात्याने एक्साईज विभागाशी चर्चा करुन  यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.

इतर वेळी रात्री दीड वाजेपर्यंत सुरु राहणारी हॉटेल्स, बार आणि पब्स 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तर रात्री साडेदहा वाजेपर्यंत वाईन शॉप्सना एक वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

वर्षअखेरीस प्रत्येकाला जल्लोष करायचा असतो, त्यामुळे आम्ही ही मुदतवाढ दिली आहे. यामुळे मुंबईला एक पर्यटनस्थळ म्हणूनही चालना मिळते. या दिवशी पोलिसांना अतिरिक्त कुमक ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. वेळेत वाढ करण्यात आली असली, तरी बार आणि पब चालकांना अद्याप पोलिसांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. पोलिस महासंचालकांना यासंदर्भात पत्र दिल्याची माहिती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या अध्यक्षांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

बारामती निवडणुकांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, "अजितसोबत जे घडले त्यानंतर कुटुंबाने निवडणूक लढवायला नको होती.

नेपाळच्या चार जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूने हाहाकार माजवला

नागपुरात बेपत्ता पतीचा शोध महागात पडला, महिलेवर भोंदू बाबाने बलात्कार केला, आरोपीला अटक

LIVE: शरद पवार म्हणाले अजितसोबत जे घडले त्यानंतर कुटुंबाने निवडणूक लढवायला नको

अकोला येथे दोन गटांमध्ये भीषण संघर्ष, अनेक जण जखमी

पुढील लेख
Show comments