Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अहमदनगरचे पालकमंत्री पद सोडण्याबाबत हसन मुश्रीफ यांचा दुजोरा

Webdunia
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (16:57 IST)
अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकाच वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, जिल्हा बँक, विधानपरिषद आदींच्या निवडणुका असल्याने दोन्ही ठिकाणी लक्ष देणे अवघड असल्याने आणि गृहजिल्हा कोल्हापूर असल्याने तिकडे लक्ष देणे गरजेचे असल्याने अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून मुक्त करावे अशी विनंती पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती ग्रामविकास तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
 
आगामी काळात कोल्हापूरला आणि अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका असल्याने दोन्हीकडे लक्ष देणे जमणार नाही. 12 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात जाऊन प्रचार करणं शक्य होणार नाही,त्यामुळे मी कोल्हापूरची जबाबदारी घेतो असं मत व्यक्त केले, मात्र हे पक्षश्रेष्ठी ठरवतील, जोपर्यंत अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी आहे तोपर्यंत प्रामाणिकपणे काम करून विकास करणार असे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
 
मी सातत्याने माझ्या नेत्यांविषयी बोलतो. त्यामुळे टार्गेट करायचं ठरवलं मात्र दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात लबाडी किंवा बेईमानी केली नसल्याचे मुश्रीफ म्हणाले. तसेच सरकार पडत नसल्याने सातत्याने बदनाम करून अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहेय मात्र ते यशस्वी होणार नाही असा पलटवार देखील मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांवर केला.
 
तसेच अजितदादांनी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. एखाद्याला टार्गेट करणं योग्य नाही त्यांना आणि कुटूंबियांना जे टार्गेट केले जाताय ते चुकीचय. तर अजितदादांना खटला दाखल करायला वेळ नाही उलट त्यांनी सांगितले किती प्रामाणिकपणे नातेवाईकांनी हा कारखाना चालवलाय, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments