rashifal-2026

जितेंद्र आव्हाडांवर अनंत करमुसे प्रकरणावरून टीका करणाऱ्यांना त्यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं

Webdunia
बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (15:36 IST)
‘हर हर महादेव’चा शो बंद पाडल्यानंतर तिथे झालेल्या गोंधळात एका प्रेक्षकाला आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी आव्हाडांना अटकही झाली. एक रात्र पोलीस स्टेशनमध्ये घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर २४ तासांच्या आत आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. एका कार्यक्रमातून परतत असताना गर्दीत आव्हाडांच्या समोर आलेल्या भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याला आव्हाडांनी हाताने बाजूला केलं. यावेळी आव्हाडांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार या महिला पदाधिकाऱ्याने दाखल केली. त्याविरोधात अटकपूर्व जामीनासाठी आव्हाडांनी न्यायालयाद दाद मागितली. आव्हाडांना तो जामीन मंजूरही करण्यात आला.

या सगळ्या गोंधळानंतर आता जितेंद्र आव्हाडांवर अनंत करमुसे प्रकरणावरून टीका करणाऱ्यांना त्यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्या माणसाने २०१६ ते २०२० या काळात माझा पाठलाग केला, ट्विटर-फेसबुकचा वापर करत बदनामी केली, ब्लॉक केल्यानंतरही दुसऱ्या मार्गाने तो मला त्रास देतच राहिला. टीका करणाऱ्यांनो, तुमच्या भावाचं, वडिलांचं किंवा तुमचं अशा प्रकारे नग्न छायाचित्र काढलं गेलं असतं किंवा इतकी वर्षं त्रास दिला गेला असता, तर आपण काय केलं असतं?”

<

ज्या माणसाने 2016 ते 2020 माझा पाठलाग केला. ट्वीटर फेसबुक चा वापर करत बदनामी केली. ब्लॉक केल्यानंतरही दुसऱ्या मार्गाने तो मला त्रास देतच राहिला टीका करणाऱ्यांनो तुमच्या भावाच,तुमच्या वडिलांच,किंवा तुमच्या स्वतःच अशाप्रकारे नग्न छायाचित्र काढल गेलं असतं तर किंवा इतके वर्षे त्रास pic.twitter.com/S7T6xb61ft

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 15, 2022 >
असा सवाल आव्हाडांनी ट्वीटच्या माध्यमातून विचारला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments