Marathi Biodata Maker

200 जणांवर मधमाशांनी हल्ला

Webdunia
शुक्रवार, 3 मे 2019 (16:52 IST)
पुण्यातल्या वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे येथे चार दिवसीय उन्हाळी शिबिरासाठी दाखल झालेल्या 151 शालेय विद्यार्थ्यांसह 200 जणांवर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षकांसह ७ जण जखमी झाले आहेत. मे ते 5 मे या कालावधीत आयोजित केलेल्या ‘शिवशौर्य साहसी बालसंस्कार शिबीर, शिवतीर्थ राजगड’ या चौथ्या चार दिवसीय उन्हाळी शिबिरात 151 शालेय विद्यार्थी, 34 स्वयंसेवक आणि 15 शिक्षक असे 200 जण सहभागी झाले होते.
 
शिबिराच्या पहिल्याच दिवशी गुंजवणे येथील समाजमंदिरात शिबिरार्थी मुलांची सोय करण्यात आली होती. विद्यार्थी वाहनातून उतरून मंदिरात जाऊन बसत होते. इतक्यात मंदिराशेजारी असणाऱ्या ‘वेळाच्या झाडा’वरील आग्या मोहोळीतील मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. यानंतर सर्व विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून गुंजवणे आणि चिरमोडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. जखमींवर करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; १८ कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि सोने जप्त

IND vs NAM दिल्लीत इशान किशनने धुमाकूळ घातला, भारताने T20 विश्वचषकात सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर केला

LIVE: पुण्यात बंगाली बोलल्यामुळे तरुणाची हत्या; ममता बॅनर्जी आक्रमक, राज्य सरकारला दिला इशारा

मुंबईत बनावट टपाल तिकिटे बनवण्याचे रॅकेट उघडकीस, पाच आरोपींना अटक

पुणे-नागपूर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; मध्य रेल्वे २४ विशेष गाड्या चालवणार

पुढील लेख
Show comments