Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मात्र मुख्यमंत्री कोण ते शिवसेनेने ठरवावं - आदित्य ठाकरे

Webdunia
शनिवार, 20 जुलै 2019 (10:16 IST)
भाजपा नेते अमित शाह व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सर्व ठरले आहे. त्यावर त्यामुळे मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही, मात्र  मुख्यमंत्री कोण ते शिवसेनेने ठरवावं, असे सूचक वक्तव्य युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या नियोजित जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा दिवस आहे. ते धुळे आणि मालेगाव भागातील नागरिकांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधला आहे. 
 
ठाकरे पुढे म्हणाले की, ही जनआशीर्वाद यात्रा असून, मतं मागण्यासाठी किंवा प्रचारासाठी नाही. विधानसभेत प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे, तेव्हा आपण निवडणुका जिंकणारच आहोत. गेली पाच वर्षे पूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना आंदोलने केली. रस्त्यावरती उतरलो. सरकारच्या माध्यमातून प्रश्न सोडवले. खासदारांसाठी निवडणुकांमध्ये जे प्रेम मतदारांनी शिवसेनेवर दाखवले आहे म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी मी जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले असून, शिवसेना कळलेली नाही त्यांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान केले, त्यांची मनं जिंकण्यासाठी ही जनयात्रा काढली आहे.
 
2012 पासून मी दुष्काळ दौरा करत आहे, पण मागच्या वर्षीचा दुष्काळ हा जरा वेगळा होता. दुष्काळी दौरा करत असताना फोटो काढणे महत्त्वाचे नसते, तर लोकांच्या अडचणी समजून त्या दूर करणे हे महत्त्वाचे असते. शेतकऱ्यांसाठी जे जे करता येईल, ते ते करत आलेलो आहे आणि यापुढेही करतच राहणार आहोत, हे वचन देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तुमच्या मनात काय आहे, तुमच्या समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले आहे, असेही ठाकरे म्हणाले.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments