Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'घरी बसून एवढं काम केलं, बाहेर पडलो तर किती होईल'- उद्धव ठाकरे

Webdunia
रविवार, 20 जून 2021 (15:03 IST)
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरात राहूनच काम केले अशी टीका सातत्याने विरोधकांकडून करण्यात आली. याला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "मी घरातून कारभार करतो अशी टीका विरोधक करतात. मला त्यांना सांगायचे आहे की, घरातून एवढं काम होतंय, घराबाहेर पडलो तर किती होईल?"
शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आपण लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन करत असताना आपण मात्र बाहेर पडायचे हे मला पटत नसल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पण मी लवकरच घराबाहेर पडणार आहे असंही ते म्हणाले.
 
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केवळ विरोधकांना प्रत्युत्तर दिलं नाही तर सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही टोले लगावले आहेत.
 
ते म्हणाले, "अनेकजण स्वबळाचा नारा देत असताना आपणही देऊ. पण न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ लागतं. माझ्यासाठी स्वबळाचा हा अर्थ आहे. निवडणुका येतात आणि जातात. विजय-पराभव होत असतो. पण हरल्यानंतर पराभवाची मानसिकता घात करते." असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments