Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्थानिकांचा विरोध नसेल तर शिवसेनेचा विरोध असण्याचे कारण नाही : संजय राउत

Webdunia
बुधवार, 30 मार्च 2022 (16:10 IST)
कोकणातील नाणार रिफायनरीला स्थानिकांचा विरोध असल्यामुळे हा प्रकल्प बारसूला हलवण्यात यावा अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. रत्नागिरीतील स्थानिकांचा विरोध असल्यामुळे हा प्रकल्प बारसूला करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. स्थानिकांचा विरोध नसेल तर शिवसेनेचा विरोध असण्याचे कारण नाही. राज्याच्या आणि देशाच्या विकासाला खिळ बसेल अशी भूमिका शिवसेनेची नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊतांनी नाणार रिफायनरीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. त्या प्रकल्पाला किंवा कोणत्या विकास कामाला, राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कधीच पुढाकार घेतला नाही. कोकणात ज्या भागात हा प्रकल्प होत आहे. तिकडची शेती, फळबागा, समुद्र, मच्छिमार समाज यांचा विरोध प्रकल्पाला आहे.

कारण या प्रकल्पामुळे त्यांच्या रोजीरोटी, शेती आणि फळबागा नष्ट होतील. यासाठी त्यांचे आंदोलन तेव्हासुद्धा सुरु होते आणि आजही ते आंदोलन नाणार भागात संपलेले नाही. याचा अर्थ तो प्रकल्प होऊ नये असे नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments