Festival Posters

रेल्वे प्रवासी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे

Webdunia
बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (10:08 IST)
जर तुम्ही रेल्वे प्रवासी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, वेळेवर न धावणाऱ्या रेल्वे आणि धीमी गती या दोन मुख्य तक्रारी प्रवाशांचा आहेत. त्याची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली आहे. त्यामुळेच प्रवाशांना आता सुखद धक्का देण्यात आला आहे. रेल्वेने काही गाड्यांचा वेग वाढविला आहे. तसेच, काही गाड्या या वेळेतच असल्याची बाब समोर आली आहे.  रेल्वे मंत्रालयाने १ ऑक्टोबरपासून “ट्रेन्स ॲट अ ग्लान्स (TAG)” म्हणून ओळखले जाणारे आपले नवीन अखिल भारतीय रेल्वे वेळापत्रक जारी केले आहे. हे वेळापत्रक १ ऑक्टोबरपासून भारतीय रेल्वेच्या www.indianrailways.gov.in. या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
नवीन वेळापत्रकात, सुमारे ५०० मेल एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. गाड्यांचा वेग १० मिनिटे ते ७० मिनिटांपर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय, १३० रेल्वेगाड्या (६५ जोड्या) अधिक वेगवान करून सुपरफास्ट श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. एकूणच सर्व गाड्यांच्या सरासरी वेगात सुमारे ५ % वाढ झाली आहे ज्यामुळे अधिक गाड्या चालवण्यासाठी जवळपास ५ % अतिरिक्त मार्ग उपलब्ध झाले आहेत. २०२२-२३ या वर्षात भारतीय रेल्वेच्या मेल एक्सप्रेस गाड्यांचा वक्तशीरपणा सुमारे ८४% आहे. जो २०१९-२० मध्ये गाठलेल्या सुमारे ७५%पेक्षा सुमारे ९% अधिक आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor
 
विस्तृत वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,1,304,366,537,2789

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला अपघात

धाराशिव जिल्ह्यात एमयूव्हीचे टायर फुटल्याने भीषण अपघात; तीन महिलांचा मृत्यू

"तुमच्याकडे मते आहे, माझ्याकडे फंड आहे..." मालेगावमध्ये प्रचारादरम्यान अजित पवार यांच्या विधानामुळे राजकीय खळबळ उडाली

बीड : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला मोठा अपघात; ४ जण जखमी

रायगडमध्ये भीषण अपघात; भरधाव एसयूव्ही ट्रकला धडकली, दोघांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments