Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एवढे लोकप्रिय आहात तर निवडणुका का टाळता?, अजित पवार यांचा सवाल

Webdunia
मंगळवार, 13 जून 2023 (20:36 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा शिंदे सरकारवर टीका केली आहे. शिवसेनेच्या जाहिरातीवर बोलण्यानंतर अजित पवार महणाले की, एवढे लोकप्रिय आहात तर निवडणुका का टाळता? यावेळी त्यांनी फडणवीसांपेक्षा शिंदे लोकप्रिय हे भाजपाला मान्य आहे का? असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
 
अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे किंवा जाहिरात देणार इतक्या लवकर कसे काय बाळासाहेबांना विसरले मला काय कळले नाही. कारण मुळातच आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे, आनंद दिघेंच्या विचारांचे सांगून त्यांनी तो पक्ष स्वत:कडे खेचून घेतला. परंतु तिथे आनंद दिघेंचा आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही कुठे दिसला नाही. अशाप्रकारच्या जाहिराती मी पाहिल्या पण स्वत:च ठरवून सर्वेक्षण केलं. कुणी सर्वेक्षण केले, कुणी सांगितलं की कोणाला किती टक्के. आता तुम्ही बघितलं तर एक्झिट पोल येतात तेव्हा सर्वे कुणी केला हे सांगता. मध्य सकाळने एक सर्वे केलेला माझ्या वाचनात आला, तेव्हा सकाळने सांगितलं आम्ही करून घेतला. तसा हा सर्वे कोणी करून घेतला आहे.
 
ते म्हणाले की, एकनाथ शिंदे इतक्या लवकर बाळासाहेबांना विसरले कसे. लोकांचा पाठिंबा असेल तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाहीत. पुढील 15 दिवसात एक वर्षे पूर्ण होईल. प्रत्येक जण विचारत आहे निवडणुका कधी लागणार. यावेळी त्यांनी फडणवीस यांपेक्षा शिंदे लोकप्रिय हे भाजपाला मान्य आहे का? असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी ठार

36 वर्षांच्या महिलेला अजगराने गिळलं

मी नाही साडी नेसत जा!', नैतिकता, संस्कृतीचे निकष महिलांच्या कपड्यापाशीच येऊन का थांबतात?

Hathras Stampede:हातरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुरतमध्ये भीषण अपघात, सहा मजली इमारत कोसळली,15 जण जखमी

सर्व पहा

नवीन

Ind vs zim : अभिषेक शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम,पदार्पणातच फ्लॉप

IND vs ZIM:पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

नरेंद्र मोदी यांनी केले किएर स्टार्मर यांचे अभिनंदन, दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा

पुढील लेख
Show comments