Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना निर्बंधांबाबत राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; १ एप्रिलपासून अंमलबजावणी

Webdunia
बुधवार, 30 मार्च 2022 (15:49 IST)
गेल्या दोन वर्षांपासून असलेले कोरोना निर्बंध अखेर संपुष्टात येणार आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार, राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोरोनाचे सर्वच निर्बंध मागे घेतले जाणार असून केवळ मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.

येत्या १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे.सुमारे दोन ते अडीच वर्षांपासून हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूवर आता भारतानेही नियंत्रण मिळविले आहे. कोरोनाच्या महामारीने दोन वर्षे सर्वांचीच कठीण परीक्षा पाहिली आहे. आता मात्र, अत्यंत दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. त्याचीच दखल केंद्र सरकारनेही घेतली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने कोरोना निर्बंध हटविण्याची घोषणा केली आहे. मात्र, मास्क घालण्याची सक्ती तेवढी कायम ठेवली आहे. केंद्र सरकारने कोरोना विषाणू संदर्भात जारी केलेले सर्व निर्बंध हटवले आहेत. देशात सातत्याने कमी होत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. कोविड निर्बंध जवळजवळ दोन वर्षे लागू होते.
 
31 मार्चपासून सर्व निर्बंध उठवले जातील. केंद्र सरकारने कोरोनाची प्रकरणे रोखण्यासाठी 24 मार्च 2020 रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. तरीही आता केवळ फेस मास्क घालणे आवश्यक असेल.केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना डीएम कायद्यांतर्गत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे काढून टाकण्यास सांगितले आहे. याबाबत ते म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे की यापुढे डीएम कायद्यातील तरतुदी लागू करण्याची आवश्यकता नाही.या नियमांची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. यानंतर गृह मंत्रालयाकडून कोणताही आदेश जारी केला जाणार नाहीत.

संबंधित माहिती

RR vs KKR : कोलकाता-राजस्थान सामना पावसामुळे रद्द

सात्विक-चिराग जोडी विजेती ठरली, लिऊ आणि चेन यांना पराभूत केले

SRH vs PBKS : हैदराबादने पंजाबचा चार गडी राखून पराभव केला

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर कोसळले

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

पुढील लेख
Show comments