Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुणरत्न सदावर्ते यांच्या सोलापुरातील पत्रकार परिषदेत जोरदार राडा, शाईफेक झाली

Webdunia
शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (15:17 IST)
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सोलापुरातील पत्रकार परिषदेत जोरदार राडा झाला. पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याने त्यांच्यावर शाई फेकली आणि निषेध नोंदवला. गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी सुरू होताच काही कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्यावर शाईफेक केली.
 
या घटनेनंतर बोलताना सदावर्ते आक्रमक झाले. संविधान दिनी हे वागणं चुकीचं आहे. आम्ही शिवरायांचे खरे मावळे आहोत. आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वातंत्रवीर सावरकर ज्या जेलमध्ये होते तिथे आम्ही उपवास करून आलेली माणसं आहोत. पाकिस्तानच्या सीमेवर आमचे भाऊ उभे असतात आणि ते पाकिस्तानला डोळे वर करून सुद्धा पाहू देत नाहीत. त्या वंशावळीतून आम्ही आलो आहोत. तेव्हा या सर्व गोष्टी आम्हाला पाणी कम चाय आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करतो, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा हातात असताना ही शाई फेकली. आम्ही अशा लोकांना घाबरत नाही. या लोकांना आम्ही उत्तर देऊ. महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सांगेन. राज्यात असंवैधानिक वागण्याची आधीच खबरदारी घेतली पाहिजे. परंतु याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार हे माफी मागणार का? असा सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments