Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजकीय परिस्थिती बदलली म्हणून प्रकल्प स्थगित करणं अयोग्य - हायकोर्ट

Webdunia
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (10:37 IST)
राजकीय परिस्थिती बदलली म्हणून प्रकल्पांना स्थगिती देणं अयोग्य असल्याचं मुंबई हायकोर्टानं व्यक्त म्हटलं. ठाणे नागरिक प्रतिष्ठाननं झाडे तोडण्यासंदर्भात हायकोर्टात याचिका केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठानं प्रकल्प रोखण्यासाठी याचिका केल्या जात असल्यावरून फटकारले.
 
"वाढणाऱ्या प्रकल्प खर्चाचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसणार आहे. शिवाय, राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असून येथे गुंतवणूक कोण करणार?" असंही हायकोर्टानं सुनावलं.

ठाण्यातील विविध 18 प्रकल्पांसाठी झाडे तोडण्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. प्रकल्पांमध्ये वडाळा ते कासारवडवली या मेट्रो-4 प्रकल्पाचाही समावेश आहे. मात्र आपल्याला या प्रकरणी प्रतिवादी करण्यात आले नाही, असा दावा एमएमआरडीएने केल्यानंतर न्यायालयाने मेट्रो-4 प्रकल्पासाठी झाडे हटवण्यास दिलेली स्थगिती उठवली होती.
 
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर तेथे पुन्हा एकदा झाडे हटवण्यास स्थगिती देण्यात आली. याबाबत ठाणे नागरिक प्रतिष्ठानने केलेल्या जनहित याचिकेची मुंबई हायकोर्टानं दखल घेतली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments