Dharma Sangrah

जिंदाल कंपनी मधील दुर्घटनेची चौकशी प्राथमिक निष्कर्षात सदरची घटना अपघात

Webdunia
मंगळवार, 17 जानेवारी 2023 (14:31 IST)
इगतपुरी येथील जिंदाल कंपनी मधील दुर्घटनेची चाैकशी करणाऱ्या उच्चस्तरीय समितीने प्राथमिक निष्कर्षात सदरची घटना अपघात असल्याचे सांगितले आहे. दुर्घटनेतील जखमी व प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्याचे काम समितीकडून केले जात आहे. या आठ दिवसांत त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिली.
 
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी (दि. १) जिंदाल पॉलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आग दुर्घटना घडली होती. यामध्ये दोन महिलांसह तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर २२ कामगार जखमी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय समितीकडून चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीसाठी समिती नेमली. सदर समितीने चौकशी सुरू केली असून, या अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांशी समितीने चर्चा केली. दुर्घटना घडली तेव्हा आणि त्याआधी काही वेळापूर्वी नेमके काय घडले याची सविस्तर माहिती कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येत आहे. तसेच समितीने कंपनी व्यवस्थापन आणि लेबर कॉन्ट्रॅक्टरकडील अहवाल पडताळणीसाठी घेण्यात आले आहेत. या अहवालांच्या पडताळणीनंतर आठवडाभरात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती पारधे यांनी दिली आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली

अमरावती : लग्नाच्या अवघ्या दोन तासांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू

नाशिक जिल्ह्यात वडिलांनी दोन मुलांसह विहिरीत उडी मारत आत्महत्या केली

वर्धा : भरधाव वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघातात पती, पत्नी आणि मुलाचा मृत्यू

किरकोळ वादातून पतीने पत्नीची हत्या केली, डोंबिवली मधील घटना

पुढील लेख
Show comments