Dharma Sangrah

वादग्रस्त निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक, दीड वर्षापासून होते फरार

Webdunia
मंगळवार, 16 जानेवारी 2024 (09:51 IST)
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने निलंबित करण्यात आलेले जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे गेल्या दीड वर्षापासून फरार होते. अखेर सोमवार दि.१५ जानेवारी रोजी सकाळी ते पोलीस अधिक्षक कार्यालयात शरण आले आहे.
 
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणारी ऑडियो क्लीप व्हायरल झाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक किरणकुमार बकाले चर्चेत आले होते. समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रकार किरणकुमार बकाले यांनी केला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विनोद देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार हे दीड वर्षांपासून फरार होते. त्यांचे निलंबन करून नाशिक येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू ते हजर न होता फरार झाले होते.
 
किरणकुमार बकाले यांनी न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यामुळे बकाले यांच्या पदरी‍ निराशा पडली होती. यातच पोलीस प्रशासनाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज केला होता. अडचणीत वाढ होत असल्याने अखेर किरणकुमार बकाले यांनी सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात येवून हजर झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्याकडे बकाले यांना हजर करण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

प्राणघातक 'मांझा' ने घेतला दोघांचा बळी; वडील आणि मुलगी ७० फूट उंच उड्डाणपुलावरून पडल्याने मृत्यू

LIVE: नांदेडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

इराणसोबतच्या तणावादरम्यान, अमेरिकेचा मोठा निर्णय; ७५ देशांचे सर्व व्हिसा निलंबित

जप्त केलेल्या रुपयांच्या व्याजाचा अर्धा भाग सशस्त्र सेना कल्याण निधीत देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला दिले आदेश

महायुती २९ पैकी इतक्या महानगरपालिकांवर नियंत्रण ठेवेल; उपमुख्यमत्री फडणवीसांचा दावा

पुढील लेख
Show comments