suvichar

ज्येष्ठ महासंचालक संजय पांडे हे ठाकरे सरकारवर नाराज, थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिला नाराजीनामा

Webdunia
शुक्रवार, 19 मार्च 2021 (10:04 IST)
सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे प्रकरणामुळे अडचणीत आल्याने बदली झालेले मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह होमगार्डमधून बदली झालेले ज्येष्ठ महासंचालक संजय पांडे हे ठाकरे सरकारवर नाराज आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच नाराजीनामा लिहत आपल्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी केली आहे. ‘मी आजही पोलीस दलात असून माझ्या युनिफॉर्मचा तरी सन्मान करा, होमगार्डमधून मला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर पाठवून माझा अजून अपमान करू नका. मी कोणत्याही परिस्थितीत नवीन पदभार सांभाळणार नाही. मी सुट्टीवर जात आहे. गेल्या तीस वर्षात मला कायम साईडपोस्टींगच मिळाली आणि कायम माझ्यावर अन्यायच झाला. असे खरमरीत पत्र पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहल्याने पोलीस दलात नाराजीनाट्याचा नवा अंक सुरू झाला आहे.
 
संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. पण असे असतानाही त्यांना डावलून गेल्यावर्षी परमबीर सिंह यांना मुंबईचे पोलीस आयुक्त बनवले होते. तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकपदीही माझ्यापेक्षा ज्यूनियर असलेले हेमंत नगराळे यांची नियुक्ती माझ्यावर अन्यायकारकच होती. तसेच तत्कालिन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या केंद्रातील बदली नंतरही माझ्या नावाचा विचार केला नाही असेही पत्रात म्हटले आहे. माझ्या पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात माझा सीआर रिपोर्ट कायम अतुलनीय राहीलेला आहे. असे असताना मला कायम साईडपोस्टींग का? होमगार्डमध्ये मी सलग पाच वर्ष काम केल्याने आता तरी माझ्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी पांडे यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

भोंदू बाबा अशोक खरातच्या कथित कृत्यांवर आधारित मराठी चित्रपट बनणार; अभिनेत्री दीपाली सय्यद प्रमुख भूमिका साकारणार

विदर्भातील ६ जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट जारी तर ९ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट

यवतमाळ: कत्तलीसाठी तेलंगणात नेण्यात येत असलेल्या जनावरांची सुटका; तीन तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल

इंधन वाचवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अमृता फडणवीस यांनी सायकल चालवण्याचा अवलंब केला

LIVE: विदर्भातील ६ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, ९ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा

पुढील लेख
Show comments