Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमदारांना घरे देण्याचा निर्णय झालेलाच नाही

Webdunia
सोमवार, 28 मार्च 2022 (15:25 IST)
सर्व आमदारांना मुंबईत हक्काची घरं देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केली होती. या निर्णयावरुन राजकारण तापले असतानाच आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारांना घरे देण्याचा निर्णय झालेलाच नाही, त्यामुळे त्याची अंमलबजावणीही होणार नसल्याचे सांगितले. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे सरकारने या निर्णयाविरोधात घुमजाव केले की, काय अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
 
अशोक चव्हाण यांनी आज सपत्नीक उस्मानाबादेत तुळजापूरच्या देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी माध्यमांनी त्यांना आमदारांच्या घरांसदर्भात प्रश्न विचारले असता चव्हाण म्हणाले, आमदारांना घरे देण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात कोणत्याही आमदारांची मागणी नव्हती. त्यामुळे त्यावर अंमलबजावणीही केली जाणार नाही. विरोधक विनाकारण या मुद्यावरुन राजकारण करत आहेत.
 
दरम्यान, आता अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या आमदारांच्या घरांच्या निर्णयावरून घुमजाव घुमजाव केल्याचे बोलले जात आहे.

संबंधित माहिती

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

पुढील लेख
Show comments