Marathi Biodata Maker

वॅट कमी करून पेट्रोल-डिझेलचे दर सरकारने तात्काळ आटोक्यात आणावेत - जयंत पाटील

Webdunia
सोमवार, 24 सप्टेंबर 2018 (15:12 IST)
महाराष्ट्रात सर्वत्र ठिकाणी जपळपास ९०रू पर्यंत पेट्रोलच्या किमती पोहचल्या आहेत. नांदेड-परभणीकरांना तर ९२ रु. किंमत द्यावी लागत आहे. एवढा प्रचंड महागाईचा आगडोंब महाराष्ट्रात व भारतात उसळलेला आहे. जे नरेंद्र मोदी व त्यांचे प्रमुख नेते तसेच सर्व मंत्रिमंडळात बसलेले नेते हे पेट्रोल दर ५०-६० रुपये झाले तरी ओरडत होते तीच मंडळी आज नव्वदीवर पेट्रोल जाऊन पोहचले तरी काहीच बोलत नाही. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचे जगणे आता कठीण झाले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यात महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणतात की पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत घेण्यास आमची हरकत नाही. परंतु जीएसटीमध्ये पेट्रोल घेतील तेव्हा घेतील, त्यासाठी अनेक राज्यांची परवानगी लागते. पण पेट्रोलवरील बेसुमार वॅट हा सरकारच्या हातात आहे. त्याची किंमत एवढी कमी करा की किमान १५ रु. दर कमी होतील, अशी सूचना पाटील यांनी केली. पेट्रोल- डिझेलच्या किमती कमी करण्याकडे राज्य सरकार का लक्ष देत नाही, असा प्रश्न उपस्थित करतानाच मुख्यमंत्र्यांनी या देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात महाराष्ट्र अग्रेसर रहावे म्हणून ही मर्दुमकी आपण गाजवत असाल तर गरीबांनी महाराष्ट्रात जगायचे कसे असे त्यांनी विचारले. वॅट हा कर महाराष्ट्र सरकारच्या कक्षेत आहे. जो बसवण्याचा, कमी करण्याचा, वाढवण्याचा आजही अधिकार महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे. हा कर ताबडतोब कमी करावा. पेट्रोल डिझेलचे दर किमान १५ रु. कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा! प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा केली

LIVE: संजय राऊत यांना सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा; १५ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा रद्द

नांदेडमध्ये १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली; ५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यवतमाळला मोठी भेट दिली, ५७० कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेला मंजुरी

सिक्कीममध्ये दोनदा भूकंपाचे धक्के बसले; लोकांमध्ये घबराट पसरली

पुढील लेख
Show comments