Dharma Sangrah

पश्चिमी महाराष्ट्रात पूरस्थिती, 1.32 लाख लोकं प्रभावित, शाळा-कॉलेज बंद (बघा फोटो)

Webdunia
पुणे- पश्चिमी महाराष्ट्रात विशेष करुन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती भयावह झाल्यानंतर 1.32 लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित स्थानांवर हालवण्यात आले आहे. येथे सतत मुसळधार पावसामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुर आणि सांगली जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
अधिकार्‍यांनी सांगितले की मागील सात दिवसात पाऊस आणि पूरामुळे विभिन्न घटनांमध्ये 16 लोकांचा मृत्यू झाला आहे.
पुण्याचे प्रखण्ड आयुक्त डॉक्टर दीपक महाइसेकर यांनी म्हटले की 'पुणे क्षेत्रात (पुणे, सातारा, सोलापुर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात) आतापर्यंत पुरामुळे 1.32 लाख लोकं प्रभावित झाले आणि त्यांना सुरक्षित जागेवर पोहवण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात क्रमश: 53,000 आणि 51,000 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.'
महाइसेकर यांनी म्हटले की, 'सेना, नौसेना आणि राष्ट्रीय आपदा प्रतिक्रिया बल (एनडीआरएफ) चं दोन्ही जिल्ह्यात बचाव अभियान सुरु आहे आणि बुधवार संध्याकाळापर्यंत एनडीआरएफच्या सहा आणि आणखी टीम कोल्हापूरला जाणार.'
त्यांनी सांगितले की सर्व क्षेत्रांमध्ये धरणांच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी आहे आणि हवामान खात्याने पुढील चार दिवस सतत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. म्हणून संबंधित धरण क्षेत्रात अधिक पावस पडल्यास पूरस्थिती निर्माण होण्यापासून बचाव अवघड आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एका बैठकीत पूरस्थितीची समीक्षा केली. या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला धरणातून पाणी सोडणे आणि इतर प्रकल्पांबद्दल रेल्वेसह दररोज माहिती देण्यास सांगितले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

चाळीस हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तीसाठी कोणती कार सर्वोत्तम आहे

विदर्भात 'ऑपरेशन लोटस' योजनेची चर्चा, विधान परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ६० नगरसेवक नॉट रिचेबल

पुढील ३ दिवस तीव्र उष्णतेची लाट, विदर्भात रेड अलर्ट

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

पुढील लेख
Show comments