Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरोपी म्हणजे राक्षसाचा पुनर्जन्म: कोपर्डी २९ नोव्हेंबर रोजी अंतिम निर्णय

Webdunia
पूर्ण राज्य आणि देशाला हादरवणारे कोपर्डी प्रकरणी आज अखेरचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या प्रकरणी आता २९ नोव्हेंबर रोजी अंतिम निकाल कोर्ट देणार आहे. यामध्ये आज या तीन मुख्य आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आज पूर्ण झाला आहे. यामध्ये सरकारी वकील म्हणाले की या प्रकरणातील आरोपी हे राक्षसाचा पुनर्जन्म आहेत. ते तसे वागले आहेत. या तिघांनी आणि त्यांनी केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप त्यांना बिलकुल नाही. यामध्ये जर त्यांना जन्मठेप दिली गेली तरी त्यांच्यात सुधारणा होण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी' उज्ज्वल निकम यांनी कोर्टात आपले मत प्रगट केले आहे. 
 
आज सकाळी सकाळी साडे अकराच्या सुमारास निकम यांनी आरोपींच्या युक्तीवाद सुरू केला होता. जवळपास त्यांनी दीड तास हा युक्तीवाद केला आहे. तिन्ही आरोपी एकाच माळेचे मणी असून ते दोषी आहेत त्यांचा दोष लपवता अथवा माफीच्या लायक तर नाहीच उलट त्यांना फाशीच दिली पाहिजे असे असल्याचा दावा उज्ज्वल निकम यांनी केला आहे.
 
आरोपी संतोष भवाळच्या वकीलांनी कोर्टात त्यांचा अशील निर्दोष असून त्याच्याविरोधात कुठलाही पुरावा नसल्याचा दावा केला. संतोष भवाळानं गुन्हा केलेला नाही.जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलुने या दोन दोषींच्या शिक्षेबाबतचा युक्तीवाद मंगळवारी संपला आहे..आरोपींवर सिद्ध झालेल्या गुन्ह्यांमध्ये दोषींना जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. आता या प्रकरणाचा निकाल २९ नोव्हेंबर रोजी लागणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

17 february आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी विशेष

कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांना अटक

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही, फडणवीसांनी दिले आश्वासन

मुंबईत बस ने प्रवास करणे पुन्हा महागणार, बेस्ट बसचे भाडे वाढणार!

पुढील लेख
Show comments