Marathi Biodata Maker

''वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो'',मनसेनंहीउद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला

Webdunia
सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (09:02 IST)
दोन्ही गटाला परवानगी नाकारल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. त्यामध्ये, उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे, शिवसेना नेत्यांनी आनंद व्यक्त केला. तर, विरोधकांकडून त्यांच्यावर टिका करण्यात येत आहे. शिंदे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नसून टोमणे सभा असल्याचं म्हटलं. तर, मनसेनंहीउद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.  
<

वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 24, 2022 >
कार्यकर्त्यांनी वाजत गाजत यावे परंतु दसरा मेळाव्याला गालबोट लागेल असे वागू नये, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. मात्र, परवानगी मिळाल्यानंतरही दोन्ही गटांतील वाद एकमेकांवर टिका-टीपण्णी करण्यातून दिसून येत आहे. त्यातच, मनसेनंही उडी घेतली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ''वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो'', असे म्हणत एकप्रकारे उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. यापूर्वी राज ठाकरेंनीही वारसा विचारांचा असतो म्हणत उद्धव ठाकरेंवर घणाघात केला होता. त्यानंतर, मनसेनं शिवसेनेवर टिका केली होती. आता, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरुन मनसेनं पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

भाजपने निवडणुकीत धार्मिक राजकारण आणि दुटप्पीपणाचा अवलंब केला; मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आरोप केला

LIVE: मुंबईतील मतदार धार्मिक राजकारण नाकारतील काँग्रेसचा दावा

मुंबई-नाशिक महामार्गावर हिट अँड रन; डोंबिवलीतील जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू

Flashback : २०२५ मध्ये या भारतीय खेळाडूंनी क्रिकेटला निरोप दिला

T20 World Cup विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

पुढील लेख
Show comments