Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परप्रांतीय मजूरांना मुख्यमंत्र्याचे आवाहन, लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाही

Webdunia
मंगळवार, 14 एप्रिल 2020 (21:54 IST)
लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाही. परप्रांतीय कामगारांनी, मजुरांनी गावी जाण्याची घाई करु नये. अजिबात घाबरण्याचे काम नाही, राज्य सरकार तुमची संपूर्ण व्यवस्था करत आहे आणि पुढेही करेल, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परप्रांतीय मजुरांना दिलासा दिला. 
 
आज वांद्रे स्टेशनवर मजुरांचा जमाव झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मजुरांनी गावी जाण्यासाठी गाडी सुरु करण्याची मागणी केली होती. ही घटना दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
 
ठाकरे सरकारनी यावर आपली स्पष्ट भूमिका हिंदी भाषेत मांडत म्हटले की काळजी का करत आहात, तुम्ही येथे पूर्णपणे सुरक्षित आहात. लॉकडाऊन संपल्यानंतर केंद्र आणि राज्य मिळून नक्कीच तुमची गावी जाण्याची व्यवस्था करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 
या दरम्यान त्यांनी हे देखील म्हटले की अशा संकटाच्या काळात कोणीही राजकारण करणार असेल तर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments