Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महेश मांजरेकरांच्या मुलानेच नाच्याची भूमिका करावी, बदलापूर मराठा समाज आक्रमक

Webdunia
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (21:48 IST)
संभाजी राजे छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ह्या चित्रपटांवर इतिहासाची मोडतोड करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर काही संघटना आणि पक्ष आक्रमक होत याविरोधात आंदोलन करत असून हर हर महादेवचे शो बंद करत असून वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा देत आहेत.  ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट प्रदर्शित केल्यास चित्रपटगृहाचा पडदा फाडू, असा इशारा बदलापूरमधील सकल मराठा समाजाने चित्रपटगृहांना दिला आहे.
 
बदलापूरमधील सकल मराठा समाजाने शुक्रवारी चित्रपटगृह चालकांची भेट घेत या चित्रपटाला विरोध दर्शवला असून हा चित्रपट प्रदर्शित केल्यास चित्रपटगृहाचा पडदा फाडू, असा इशारा यावेळी चित्रपटगृहांना देण्यात आला. त्यावर चित्रपटगृहचालकांनीही सहकार्याची भूमिका घेतली, अशी माहिती सकल मराठा समाजाकडून देण्यात आली. तसेच हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित न करण्याची मागणी त्यांनी चित्रपटगृह चालकांकडे केली आहे.
 
“महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर हा मराठा वीर मावळा म्हणून शोभत नाही. मांजरेकरांना त्याला लाँच करण्याची इतकीच घाई असेल, तर त्यांनी त्याला एखाद्या चित्रपटात नाच्याची भूमिका द्यावी,” अशीही टीका यावेळी मराठा समाजाकडून करण्यात आली.
 
 वेडात मराठे वीर दौडले सात वादात सापडला
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच वादात सापडला आहे. मांजरेकरांच्या या चित्रपटाची घोषणा एका मोठ्या कार्यक्रमात झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा उपस्थित होते. चित्रपटाचे काही पोस्टर रिलीज झाले आहेत त्या पोस्टरवरून संभाजी राजे यांनी आक्षेप घेतला असून असल्या प्रकारचे चित्रपट न प्रदर्शित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
 
Edited  By -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

Mahakumbh Stampede : अपघाताची न्यायालयीन चौकशी होणार,पीडितांना 25 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार

केंद्र सरकारने महाराष्ट्रातून 9 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

बांगलादेशात रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप, गाड्यांची चाके ठप्प, माल वाहतुकीवर परिणाम

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने राष्ट्रीय खेळांमधील खेळाडूंच्या सुरक्षेसाठी सक्षम, हेल्पलाइन सुरू केली

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपींचा मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुढील लेख
Show comments