Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एल्गार प्रकरणातील बोगस कागदपत्रे जाहीर करा : प्रकाश आंबेडकर

Webdunia
बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (08:30 IST)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार प्रकरणातील बोगस कागदपत्रे जाहीर करून केंद्र सरकार लोकशाहीची कशी गळचेपी करत आहे हे उघड करावे. या कागदपत्रांद्वारे मोदी सरकारचा आणि तत्कालीन फडणवीस सरकारचा पर्दाफाश होईल, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
 
एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केले असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. नको असलेले कायदे या ठिकाणी लावण्यात आले आहेत. हे सुरू असतानाच राज्यात देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एल्गार प्रकरण बोगस असल्याचं सांगितलं. तसेच एल्गार प्रकरणी तयार करण्यात आलेली कागदपत्रेही बनावट असल्याचं पवारांनी पत्रात नमूद केलं असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे. त्यामुळे त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीची कशी गळचेपी करत आहे हे जनतेला माहीत पडेल, असं आंबेडकर म्हणाले. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments