Dharma Sangrah

दुकानांना मराठी पाट्याः राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला हा इशारा

Webdunia
शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (08:37 IST)
राज्यातील दुकानांना मराठी पाट्या लावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. याबाबत राज यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला चांगलाच टोला लगावला आहे. तसेच, या निर्णयाचे खरे श्रेय हे मनसे आणि मनसैनिकांना असल्याचेही म्हटले आहे.
 
राज यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरं तर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला. आंदोलने केली. शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला. तेव्हा त्याचे श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकांचाच.
 
राज पुढे लिहितात की, यानिमित्त महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, याची अंमलबजावणी नीट करा. यात आणखी एक भानगड सरकारने करुन ठेवली आहे ती म्हणजे, मराठी भाषेशिवाय इतर भाषेचेही नामफलक चालतील. याची काय गरज आहे. महाराष्ट्राची भाषा देवनागरी लिपीतील मराठी आहे. देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार. आणि याची आठवण आम्हाला पुन्हा करायला लावू नका. महाराष्ट्र सैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments