Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिरज : ३५०० खाऊच्या पानाला मिळाला ४५०० रु.विक्रमी दर!,शेतकऱ्यांना चांगला फायदा

Webdunia
सोमवार, 24 जुलै 2023 (08:36 IST)
मिरज तालुक्यातील  नरवाड  येथील पान‌ बाजारात झालेल्या सौंद्यात तानाजी चव्हाण पान‌ उत्पादक शेतकऱ्यांला ३५०० पानाला तब्बल  ४५०० रूपये मिळाले आहे. यामुळे पानमळा शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून पान विक्रीत तेजीत आली असून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.
 
नरवाड येथे बेडग, माळीवाडी, लक्ष्मीनगर, विजयनगर, म्हैसाळ अन्य भागात काही शेतकरी पानमळा शेती करतात.सदर पानांचा सौदा नरवाड येथे केला जातो.याठिकाणी परीसरांतील शेतकरी आपले पानांचे डाग आणतात.दररोज सायंकाळी या पानांचा सौदा संत बाळू मामा पान कंपनी नरवाड यांच्या वतीने केला जातो. सर्व पांन डागांचे एकत्रीकरण करून सौदा केला जातो व  जागेवरच पानांची बिल पट्टी शेतकऱ्यांना दिली जाते अशी माहिती संचालक नितीन खरमाटे यांनी बोलताना दिली.नंतर सदर पानांची विक्री करण्यासाठी मुंबई,पुणे बाजार पेठात पाठवली जाते असेही खरमाटे यांनी सांगितले.याठिकाणचे शेतकरी प्रामुख्याने कळी व‌ फापडा पानांचे उत्पादन घेतात.स्थानिक पातळीवर कळी पानाला मागणी असल्याने येथेच विक्री केली जाते. तर फाफडा पानाला मुंबई पुणे बाजार पेठात विक्री साठी पाठवले जाते.कोरोना काळापासून पानाला फारसा दर मिळत नव्हता.

मात्र या वर्षभरात पानाला चांगला दर मिळतो आहे.उत्पादन खर्च वजा जाता किमान ६० ते ७० टक्के रक्कम मिळते.परंतु अलिकडे  या कामासाठी कुशल व अनुभवी मजूर फारसे मिळत नाहीत.यामुळे मिळेल‌ त्यांना अधिक मजूरी द्यावी लागते.अशी माहिती तानाजी चव्हाण यांनी दिली.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी ठार

36 वर्षांच्या महिलेला अजगराने गिळलं

मी नाही साडी नेसत जा!', नैतिकता, संस्कृतीचे निकष महिलांच्या कपड्यापाशीच येऊन का थांबतात?

Hathras Stampede:हातरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुरतमध्ये भीषण अपघात, सहा मजली इमारत कोसळली,15 जण जखमी

सर्व पहा

नवीन

Ind vs zim : अभिषेक शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम,पदार्पणातच फ्लॉप

IND vs ZIM:पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

नरेंद्र मोदी यांनी केले किएर स्टार्मर यांचे अभिनंदन, दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा

पुढील लेख
Show comments