Marathi Biodata Maker

चिंताजनक : राज्यात एचआयव्हीचे प्रमाण जास्त

Webdunia
शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (11:40 IST)
गेल्या तीन वर्षांत देशात एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र त्याचबरोबर काही राज्ये एचआयव्ही संसर्गाची नवी ठिकाणे म्हणून समोर आली असून महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत एचआयव्हीचे प्रमाण जास्त असल्याचे रोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी संसदेत सांगितले आहे. 
 
ते म्हणाले, की इतर राज्यात एचआयव्हीचे प्रमाण कमी होत असून मेघालय, मिझोराम व त्रिपुरा या राज्यांमध्ये प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. तीन वर्षांत एकूण एचआयव्ही बाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. २०१५-१६ मध्ये २,००,४६५ जणांना एचआयव्ही बाधा झाली. २०१६-१७ मध्ये हे प्रमाण १,९३,१९५ होते. तर २०१७-१८ मध्ये ते १,९०,७६३ झाले. तीन वर्षांत महाराष्ट्रात एचआयव्हीचे प्रमाण जास्त असून तेथे २०१७-१८ च्या आकडेवारीनुसार  २८,०३० रुग्ण आहेत. मिझोराम, मेघालय व त्रिपुरा या राज्यात एचआयव्हीचा प्रादुर्भाव वाढत आहे कारण तेथे गर्भवती महिलांमध्ये व जोखमीच्या गटात (वेश्या व इतर) एचआयव्हीचे प्रमाण जास्त आहे. देशभरात एचआयव्हीचे प्रमाण कमी होत असताना या तीन राज्यांत मात्र एचआयव्हीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले

अजित पवारांचा मृत्यू १००% कट, विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला

LIVE: अजित पवार विमान अपघातानंतर मुलगा जय पवार यांनी खाजगी चार्टर कंपनीवर गंभीर आरोप केले

US-Iran conflict: कच्च्या तेलाचा दर ८२ डॉलरवर पोहोचला, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील? परिणाम जाणून घ्या

नागपूरमधील एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये मोठा स्फोट; १८ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments