Festival Posters

मुंबई थंडी वाढली! कमी तापमानाची नोंद

Webdunia
सोमवार, 16 जानेवारी 2023 (14:47 IST)
मुंबई : मुंबईत हुडहुडी वाढली आहे. या वर्षीच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत आज (दि. १६) सकाळी पारा १३.८ अंशावर पोहोचला होता. यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे. मुंबईत १५ ते १७ जानेवारी दरम्यान थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून मागील आठवड्यात वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, मुंबईतील तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे.
 
दरम्यान, मुंबईत रविवारी (दि. १५) दिवसाच्या कमाल तापमानामध्ये देखील घट झाली आहे. रविवारी कमाल तापमान २६.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा पाच अंश कमी आहे. या हिवाळ्यामध्ये आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान २५ डिसेंबर रोजी १५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यानंतर आज १३.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
 
मुंबईची हवा आज दिल्लीपेक्षाही वाईट स्थितीमध्ये गेल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे हवा प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे बघायला मिळाले. मुंबईतील तापमानामध्ये घट झाल्यानंतर शहरामधील हवा गुणवत्ता पातळी कमालीची खालवली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्यापुन्हा एकदा डोके वर काढू शकतात. मुंबईतील किमान तापमानामध्ये यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी अशी नोंद बघायला मिळाली आहे. मुंबईतील किमानतापमान १३.८ अंशांवर गेल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे मुंबईतील हवा गुणवत्ता पुन्हा एकदा अत्यंत वाईट स्थिती गेल्याची बघायला मिळाली. दिल्लीपेक्षा देखील जास्त मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक खालावल्याचे सफरच्या नोंदीनुसार पाहायला मिळाले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला

ऑलिम्पिक पदक विजेता टेनिसपटू लिएंडर पेस तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील

एका किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी वसईत चिमुकल्याला जमिनीवर आपटले

नक्षलवादाच्या निर्मूलनाचे श्रेय एकट्याने घेणे दुर्दैवी, अमित शाह यांच्या वक्तव्याला प्रियंका चतुर्वेदी यांचे प्रत्युत्तर

नालंदा : शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू; पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून नुकसान भरपाईची घोषणा

पुढील लेख
Show comments