Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवकाळी पावसाचा फटका बसणार आर्थिक राजधानी मुंबईला

Webdunia
गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (09:15 IST)
राज्यभर पडत असलेल्या अवकाळी म्हणावे अश्या पावसाचा फटका आता मुंबईकरांना बसणार आहे. या पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर मतोह परिणाम झाला असून, पालेभाज्यांच्या आवक घटल्याने त्याचे बाजारभाव वाढत आहेत.  पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्याची झळ आता मुंबईकरांना बसणार आहे. यात कोथिंबीरची जुडी 25 ते 30 रुपयांवर पोहोचली असून, मुंबई, नवी मुंबई परिसरासाठी रोज 6 ते 7 लाख पालेभाज्यांच्या जुड्यांची गरज असते. मात्र सद्य स्थितीमध्ये सरासरी साडेचार ते पाच लाख जुडयांचीच आवक होऊ लागली आहे.याचा सरळ सरळ परिणाम हा बाजारभावावर झाला आहे.
 
होलसेल मार्केटमध्ये आठवडयापूर्वी कोथिंबीरची जुडी 20 ते 30 रुपयांना विकली जात होती. त्यामध्ये वाढ होऊन 25 ते 55 रुपयांवर गेली आहे. शेपू, मेथी आणि अन्य पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. महागाई दर कमी होऊनही पुन्हा एकदा मुंबई ठरले देशातील, तर हाँगकाँग जगातील सर्वात महागडे शहर नाशिक, पुणे, सातारा परिसरातून मुंबईला भाजीपाला विक्रीसाठी येतो, राज्यभर पडलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, त्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे.
 
सध्याचे पालेभाज्यांचे भाव:
1. कोथिंबीर- 25 ते 55 रुपये जुडी
 
2. मेथी- 20 ते 40 रुपये
 
3. पालक- 10 ते 25 रुपये

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कांदिवली परिसरात तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

फडणवीसांनी दिला इशारा- शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकांविरुद्ध दाखल होईल FIR

मुंबईत बेस्ट बसने दुचाकीला उडवलं, चिमुकलीचा जागीच मृत्यू

राज्यातील 4 विधानपरिषदेसाठी मतदान आज

डकवर्थ-लुईस नियमाचे सह-निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन

सर्व पहा

नवीन

आशिया कपच्या वेळापत्रकात मोठा बदल,या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार

Paris Olympics: अदिती आणि दीक्षा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

Lok Sabha: राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील,विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय

राहुल गांधी विरोधी पक्षनेते, लोकसभेत 10 वर्षांनंतर असणार विरोधी पक्षनेता; हे पद का महत्त्वाचं?

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला की त्याच्या खेळीतून आणखी काही संदेश दिला आहे?

पुढील लेख
Show comments