Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रात्री बुडालो तर काय केले असते आमची काही किंमत नाही का ? पुणेकर

mutha right canal
Webdunia
गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (17:27 IST)
मुठा कालवा फुटल्याने नागरिक भयानक संतापले आहे. पुण्यात फक्त आणि फक्त त्या कालव्याची चर्चा आहे. नागरिकांनी मनपा आणि सरकारला काही प्रश्न केले आहेत. मुठा कालवा जर रात्री फुटला असता तर काय केले असते असा सवाल इथले रहिवासी विचारत आहेत. गुरुवारी सकाळी दांडेकर पुलाजवळील मुठा नदीचा कालवा फुटला आहे. हा कालवा फुटून काही मिनिटात पाण्याचा मोठा प्रवास दांडेकर पुलाजवळील रहिवासी  झोपडपट्टी भागात वेगात शिरला होता, त्यामुळे सारे होत्याचे नव्हते झाले आहे. हा प्रकार इतक्या वेगात झाला की, एकमेकांना हात देऊन नागरिक बाहेर निघाले आहे. तर पाण्यात आणि घरात अडकलेल्या अडकलेल्या अनेकांना अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी दोरीच्या साहाय्याने  काढले. यात स्थानिक नागरिक सोबत असल्याने अरुंद गल्ल्या, बोळी आणि घरे अग्निशमन दलाला सापडली.मात्र ही दुर्घटना रात्री घडली असती तर काय झाले असते असा सवाल स्थनिक नागरिक विचारत होते. झोपडपट्टीत राहणारे माणसेही माणसेच आहेत. त्यांनाही जीव आहेत. असा कालवा जवळ असताना पाटबंधारे विभाग काहीही करत नसेल तर मात्र आमचे जीव काहीच किंमतीचे आहे का असा संतप्त सवाल विचारला आहे. सुमारे 18 वर्षांपूर्वी इथे भिंत बांधण्यात आली होती. आज आलेल्या पाण्यामुळे भिंत निम्मी वाहत गेली. त्यामुळे कुठली भिंत आणि कसले घर असा प्रश्न इथले रहिवासी विचारत आहेत..

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

थोरियम अणुभट्टीचा विकास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सहकार्य करारावर स्वाक्षरी

नागपूरमधील अॅल्युमिनियम कारखान्यात भीषण स्फोट

अमित शहा रायगड दौऱ्यावर

LIVE: नागपूरच्या अॅल्युमिनियम प्लांटमध्ये स्फोट

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची एसआयटी चौकशीची काँग्रेसची मागणी

पुढील लेख
Show comments