Marathi Biodata Maker

माझे आजोबा विचार करतील की, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचे अनावरण होत आहे, आदित्य ठाकरे यांची शिंदे गटावर टीका

Webdunia
सोमवार, 23 जानेवारी 2023 (08:32 IST)
विधिमंडळात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र, यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने येणार का? याची जास्त चर्चा रंगली आहे. तसेच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा भाजप हा राजकीय कार्यक्रम असल्याची टीका केली. तर, आदित्य ठाकरे यांनीदेखील या कार्यक्रमाबद्दल आपले मत स्पष्ट करत शिंदे गट आणि भाजपवर टीका केली.
 
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, "माझे आजोबा विचार करतील की, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचे अनावरण होत आहे. एका घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे" असा टोला त्यांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, "एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेमुळे राज्य मागे गेले. जेवढे ते खालच्या पातळीवर जातील, तेवढे आपण मोठ्या उंचीवर जाणार आहोत. कशाची भीती होती म्हणून सुरतला पळून गेलात? तुम्ही असे काय खाल्ले होते, की जे अपचन झाल्यानंतर पचन होण्यासाठी एवढ्या दूर जावे लागले? ही टोळी उद्योगांमध्ये घुसल्यानंतर आपले काही खरे नाही, म्हणून उद्योग राज्याबाहेर जात आहेत." अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
 
२३ जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच, विधिमंडळामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार असून अनेक नेते यासाठी उपस्थित राहणार आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: गडचिरोलीमध्ये NCP नेत्या गीता हिंगे यांचे अपघातात निधन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गीता हिंगे यांचे रस्ते अपघातात निधन; गडचिरोलीत शोककळा

इंडिगो संकटावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला, म्हणाले-सरकार चौकशी करत आहे

इंडिगोचे संकट सहाव्या दिवशीही सुरूच; विमान कंपनीने ६१० कोटी रुपये परत केले

'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रास्ते योजना' ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली

पुढील लेख
Show comments