Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक : बिबट्याचा थरार, शेतक-यावर हल्ला करुन झाडावर चढला

Webdunia
रविवार, 14 जानेवारी 2024 (10:50 IST)
निफाड येथून जवळच असलेल्या नांदुर्डी गावात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर भर दिवसा बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने या शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्याने बिबट्याला पलायन करणे भाग पाडले.  नंतर हा बिबट्या जवळच्या नारळाच्या झाडावर चढून बसला होता. शेतकऱ्यांनी आरडा ओरड केल्यानंतर बिबटया मकाच्या शेतात पळून गेला. या घटनेमुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे.
 
निफाड तालुक्यातील नांदुर्डी शिवारातील अंबादास निवृत्ती खापरे, कैलास नारायण खापरे यांच्या शेतात शुक्रवार सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याचा हा थरार शेतकऱ्यांनी अनुभवला.
 
सागर खापरे हे मका शेतीला पाणी देत असताना त्यांच्या पाठीमागून बिबट्या हा अतिशय दबक्या पावलाने त्यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता.  मात्र त्यांच्या पाळीव कुत्र्याने बिबट्याला पाहताच, मालकाकडे पाहून भुंकायला सुरुवात केली.
 
कुत्रा भुंकताच सागर खापरे यांनी मागे वळून पाहिल्याने बिबट्याने क्षणात तिथून धूम ठोकली आणि तो जवळच असलेल्या नारळाच्या झाडावर सरसर चढून गेला. तेथून पुन्हा काही क्षणात तो खाली उतरून मक्याच्या शेतात पसार झाला. या सर्व प्रकाराने शेतातील काम करत असलेल्या शेतकऱ्यांची गाळणच उडाली होती. केवळ नशीब बलवत्तर म्हणून सागर खापरे या बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments