Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिल्ह्यातील ‘या’ शहरात आता नो एन्ट्री, रस्ते केले पालिकेने बंद

Webdunia
सोमवार, 3 मे 2021 (16:16 IST)
कोपरगाव शहरात आज रुग्णसंख्येने काहीसा दिलासा दिला असला तरी धोका मात्र टळलेला नाही.
 
कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी कोपरगाव पालिकेने संपूर्ण शहरातील रस्ते ८ मे पर्यंत बंद केले असून, फक्त साई कॉर्नर पासूनच अत्यावश्यक कामासाठी ये-जा करण्यास रस्ता खुला ठेवला आहे.
 
यामुळे शहरवासियांनी विनाकारण घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे. शहरात व ग्रामीण भागात रोज बाधित रुग्ण आढळत आहे.
 
हे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने १५ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. त्याची प्रशासन तंतोतंत अंमलबजावणी करत असताना स्थानिक पातळीवर ८ मे पर्यंत जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.याचा परिणाम आज सकारात्मक दिसून अवघे ६९ रुग्ण आढळले असले तरी धोका मात्र टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर पालिकेने साखळी तोडण्यासाठी शहरातील रस्ते ८ मे पर्यंत पूर्ण बंद केले आहेत.
 
फक्त अत्यावश्यक कामासाठी साई कॉर्नर येथील रस्ता खुला ठेवण्यात आला आहे. यामुळे शहरातील नागरिक बाहेर जाऊ शकत नाही,
 
तर बाहेरील देखील शहरात येऊ शकणार नाही, असे मुख्याधिकरी सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments